'परीक्षा पे चर्चा'चा उद्देश परीक्षेमुळे येणाऱ्या ताणाचं रूपांतर यशात करणं - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) परीक्षेमुळे येणाऱ्या ताणाचं रूपांतर यशात करणं आणि परिक्षार्थींनी हसतखेळत ध्येयप्राप्ती करणं हा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. प्रधानमंत्री विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा या विषयावर थेट संवाद साधणार आहेत. असं या संदर्भातील एक पोस्टमध्ये म्हटलं आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक परीक्षा पे चर्चा २०२४ या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. यामध्ये त्यांना पंतप्रधानांशी थेट संवाद साधण्याची संधी प्राप्त होऊ शकते. या बद्दलची अधिक माहिती इनोव्हेट इंडिया डॉट माय जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image