एम. व्ही. मंगलम या कार्गो जहाजावरच्या १६ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात रेवदंडा बंदराजवळ समुद्रात बुडालेल्या एम व्ही मंगलम या कार्गो जहाजावरच्या १६ कर्मचाऱ्यांना तट रक्षक दलानं सुरक्षितरित्या किनाऱ्यावर आणलं आहे.

मुंबईतल्या समुद्री बचाव समन्वय केंद्राला आज सकाळी हे कार्गो जहाज बुडत असल्याचं समजलं होतं. त्यानंतर प्रतिकूल परिस्थितीतही तट रक्षक दलाच्या सुभद्रा कुमारी चौहान या जहाजासह २ हेलिकॉप्टरनी हे बचावकार्य पूर्ण करत या कर्मचाऱ्यांना रेवदंडा किनाऱ्यावर आणलं.

बंदरावर पोचताच या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदत पुरवण्यात आली.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image