कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई सरकारने द्यावी - अंबादास दानवेंची मागणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कांद्याला किमान आधारभूत किंमत मिळावी, अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, आदी मागण्यांवर  विरोधी पक्षांनी आज नागपूर विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं गेल्या एक ते दीड वर्षात १० ते १२ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या नियमांपेक्षा ही मदत जास्त आहे.  केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातबंदीचा कालावधी वाढवल्याच्या मुद्यावर ते म्हणाले की, राज्य सरकारनं  या बाबत केंद्र सरकारशी चर्चा केली आहे. राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image