आशियाई क्रीडास्पर्धांमधे भारताची आजवरची सर्वाधिक पदकांची कमाई

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हाँगझो आशियाई क्रीडा स्पर्धांमधे आज तिरंदाजीच्या सांघिक प्रकारात ओजस देवतळे, प्रथमेश जावकर आणि अभिषेक शर्मा यांच्या चमूनं कोरियाच्या संघाचा २३५ विरुद्ध २३० असा पराभव करुन सुवर्णपदक मिळवलं. ज्योती सुरेखा वेण्णम, प्रणित कौर आणि अदिती गोपीचंद यांच्या महिला संघानेही तिरंदाजीत सुवर्णपदक मिळवलं.  स्क्वॅशमधे मिश्रगटात दीपिका पल्लिकल आणि हरिंदर संधू यांच्या जोडीने मलेशियाच्या जोडीचा २-० असा पराभव करुन सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताच्या पुरुष कबड्डी संघाने ग्रुप ए च्या सामन्यात तैवानचा ५० विरुद्ध २७ गुणांनी पराभव केला. भारताचा पुढचा सामना आता जपानबरोबर होणार आहे. ८३ पदकांसह भारत पदक तालिकेत चौथ्या स्थानावर आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image