राज्यभरातल्या सव्वा २ हजारांहून अधिक ग्रामपंचातींमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५ नोव्हेंबरला मतदान

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरातल्या सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, तसंच २ हजार ९५० सदस्यपदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी, येत्या ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज मुंबईत ही घोषणा  केली. संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, असं त्यांनी सांगितलं. उमेदवारी अर्ज येत्या १६ ते २० तारखेदरम्यान दाखल करता येतील. येत्या २३ तारखेला छाननी होईल. येत्या २५ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागं घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचं होईल. ५ नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत मतदान, तर मतमोजणी ६ नोव्हेंबरला होईल. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी साडेसात ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तिथं ७ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image