आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत सुमारे ६४ हजार लोकांनी घेतली आपले अवयव दान करण्याची शपथ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या महिन्यात सुरु झालेल्या आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत आता पर्यंत  सुमारे ६४ हजार लोकांनी आपले अवयव दान करण्याची शपथ घेतली आहे. ही मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत 'सेवा पंधरवडा' म्हणून राबवली गेली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही अवयवदानासाठी नोंदणी केली आहे. या मोहिमेअंतर्गत सुमारे २ लाख ७० हजार आरोग्य मेळावे आयोजित केले गेले होते. यामध्ये एक कोटी ६१ लाखांहून अधिक लोकांनी लाभ घेतल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच या मोहिमेत १४ हजार १५७ रक्तदान शिबिरे घेण्यात आली असून त्यामध्ये सुमारे दोन लाख २८ हजार युनिटस  रक्त संकलित करण्यात आलं  आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image