देशातल्या रेल्वे अपघातात कमालीची घट - मंत्री अर्जुन मुंडा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वे कटीबद्ध असून, देशातल्या रेल्वे अपघातात कमालीची घट झाली असल्याचं आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ते आज राजधानी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. गेल्या आर्थिक वर्षात ४८ रेल्वे अपघात झाले. ही संख्या २०१४-१५ या कालावधीत १३५ इतकी असल्याचं ते म्हणाले. तब्बल १ लाख कोटी रुपयांचा राष्ट्रीय रेल संरक्षण कोष निर्माण करण्यात आला असून गेल्या ९ वर्षात रेल्वेनं ४ लाख ८८ हजारांहून जास्त लोकांना रोजगार दिल्याचंही अर्जुन मुंडा यांनी सांगितलं.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image