देशातल्या रेल्वे अपघातात कमालीची घट - मंत्री अर्जुन मुंडा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वे कटीबद्ध असून, देशातल्या रेल्वे अपघातात कमालीची घट झाली असल्याचं आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ते आज राजधानी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. गेल्या आर्थिक वर्षात ४८ रेल्वे अपघात झाले. ही संख्या २०१४-१५ या कालावधीत १३५ इतकी असल्याचं ते म्हणाले. तब्बल १ लाख कोटी रुपयांचा राष्ट्रीय रेल संरक्षण कोष निर्माण करण्यात आला असून गेल्या ९ वर्षात रेल्वेनं ४ लाख ८८ हजारांहून जास्त लोकांना रोजगार दिल्याचंही अर्जुन मुंडा यांनी सांगितलं.

Popular posts
जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक - उपराष्ट्रपती
Image
‘बार्टी’च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये रुजू
Image
तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागरिकांना कुपोषण-मुक्त भारतासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आणि योगदान देण्याचे आवाहन
Image
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचं निधन
Image
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड
Image