भारतीय अन्न महामंडळाकडच्या राखीव तांदळाची विक्री खुल्या बाजारात ई लिलावाद्वारे करायचा केंद्र सरकारचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चालू हंगामात भाताचं उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने भारतीय अन्न महामंडळाकडच्या राखीव तांदळाची विक्री खुल्या बाजारात ई लिलावाद्वारे करायचा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे. केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक पुरवठा खात्याचे सचिव संजीव चोपड़ा यांनी सांगितलं की व्यापक जनहिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असून त्यामुळे तांदळाच्या किरकोळ दरवाढीला चाप बसेल. सध्या महामंडळाकडे तांदूळ पुरेसा उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले. चालू हंगामातला तिसरा ई लिलाव उद्या सुरु होईल.

Popular posts
जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक - उपराष्ट्रपती
Image
‘बार्टी’च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये रुजू
Image
तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागरिकांना कुपोषण-मुक्त भारतासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आणि योगदान देण्याचे आवाहन
Image
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचं निधन
Image
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड
Image