भारतीय अन्न महामंडळाकडच्या राखीव तांदळाची विक्री खुल्या बाजारात ई लिलावाद्वारे करायचा केंद्र सरकारचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चालू हंगामात भाताचं उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने भारतीय अन्न महामंडळाकडच्या राखीव तांदळाची विक्री खुल्या बाजारात ई लिलावाद्वारे करायचा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे. केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक पुरवठा खात्याचे सचिव संजीव चोपड़ा यांनी सांगितलं की व्यापक जनहिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असून त्यामुळे तांदळाच्या किरकोळ दरवाढीला चाप बसेल. सध्या महामंडळाकडे तांदूळ पुरेसा उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले. चालू हंगामातला तिसरा ई लिलाव उद्या सुरु होईल.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image