राज्यातल्या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. राज्य विधानपरिषदेवर राज्यपालांनी नेमण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक यादी पाठवली होती. त्यावर तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कारवाई केली नव्हती. सरकार बदलल्यावर नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन यादी पाठवली.  यासंदर्भात दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. त्यातल्या एका याचिकाकर्त्याला याचिका मागे घेण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे. तर दुसऱ्या याचिकाकर्त्याला दाद मागायची असल्यास नव्याने याचिका करायला सांगितलं आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image