आषाढी यात्रेनिमित्त सोडलेल्या विशेष बसगाड्यांद्वारे एसटीला २७ कोटी ८८ लाखांचे उत्पन्न

 

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदा आषाढी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी.महामंडळानं सोडलेल्या विशेष बसगाड्यांद्वारे २७ कोटी ८८ लाख रुपयांचं उत्पन्न एसटीला मिळालं आहे. २५ जून ते ५ जुलै दरम्यान सुमारे ५ हजार विशेष बसगाड्या सोडल्या होत्या. या गाड्यांच्या १७ हजार ५६६ फेऱ्यांमधून ८ लाख ८१ हजार ६६५ प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला. 

७५ वर्षावरच्या ज्येष्ठांना मोफत प्रवास, आणि महिलांसाठी तिकिट दरात ५० टक्के सवलत या राज्य शासनाच्या दोन योजनांमुळे यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रवाशी संख्या २ लाख ४५ हजार ६७० ने वाढली, तर ७ कोटी ६९ लाख रुपये उत्पन्न अधिक मिळालं, असं एसटी महामंडळाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image