शिक्षण म्हणजे मानवी संस्कृतीचा पाया असून भविष्यातल्या मानवी संस्कृतीचे शिल्पकार आहे, असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शिक्षण म्हणजे मानवी संस्कृतीचा पाया असून भविष्यातल्या मानवी संस्कृतीचे शिल्पकार आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पुण्यात आयोजित जी-20 देशांच्या शिक्षण विषयक कार्यगटाच्या परिषदेला दिलेल्या व्हिडीओ संदेशात त्यांनी म्हटलंय की, किमान अंक आणि अक्षरओळख प्रसाराला भारताने प्राधान्य दिलं असून संघटनेतल्या इतर देशांनीही त्याचं महत्त्व मान्य केलं आहे. या उद्दिष्टासाठी कालबद्ध रीतीने येत्या २०३० वर्षापर्यंत काम करण्याची गरज आहे असं ते म्हणाले. ईलर्निंग सारख्या आधुनिक तंत्राचा वापर शिक्षण प्रसारसाठी केला पाहिजे, असं सांगून त्यांनी स्वयंम या सरकारी उपक्रमाचा उल्लेख केला. 

Popular posts
जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक - उपराष्ट्रपती
Image
‘बार्टी’च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये रुजू
Image
तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागरिकांना कुपोषण-मुक्त भारतासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आणि योगदान देण्याचे आवाहन
Image
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचं निधन
Image
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड
Image