बंगालच्या उपसागरात येत्या दोन दिवसात चक्रीवादळ निर्माण होण्याचा भारतीय हवामान विभागाचा इशारा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात भारताच्या आग्नेय तटावर येत्या दोन दिवसात कमी दाबाचा पटटा आणि त्यातून चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे भारताच्या पूर्व भागातील राज्यात सागरी किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात अंदमान आणि निकोबार बेटावर तुरळक ठिकाणी जोरदार तर बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.तसच बंगालच्या उपसागरात ताशी 40 ते 50  किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने छोटी जहाजे तसच मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image