बंगालच्या उपसागरात येत्या दोन दिवसात चक्रीवादळ निर्माण होण्याचा भारतीय हवामान विभागाचा इशारा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात भारताच्या आग्नेय तटावर येत्या दोन दिवसात कमी दाबाचा पटटा आणि त्यातून चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे भारताच्या पूर्व भागातील राज्यात सागरी किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात अंदमान आणि निकोबार बेटावर तुरळक ठिकाणी जोरदार तर बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.तसच बंगालच्या उपसागरात ताशी 40 ते 50  किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने छोटी जहाजे तसच मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
Image
देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन
Image