स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा महाराष्ट्राच्या सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये काढण्यात येणार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा महाराष्ट्राच्या सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये रामनवमीपासून ६ एप्रिल पर्यंतच्या काळात काढण्यात येणार आहे आणि या गौरव यात्रेची जबाबदारी भाजपा पदाधिकाऱ्यांना दिली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आज नागपूर मध्ये पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीनं सावरकरांचा अपमान केला आहे, याच्या निषेधार्थ सावरकर गौरव यात्रा महाराष्ट्रभर काढण्यात येईल आणि त्या माध्यमातून सावरकरांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले असे जाहीर करावे. केवळ सत्तेसाठी ते काँग्रेस सोबत आहेत असा आरोप त्यांनी केला. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image