शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी आणि सभात्याग

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकरी आत्महत्या करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केला. या शेतकऱ्यांना तत्काळ मदत सरकार जाहीर करत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकार आवश्यक मदत देईल, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. सरकारनं तातडीनं पंचनामे सुरू केले, काही काम अद्याप बाकी आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावर शेतकऱ्याला मदत देऊ, विरोधकांनी राजकारण यावर करू नये, असंही मुख्यमंत्री म्हणाले. या उत्तरानं समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी हौद्यात येऊन घोषणाबाजी केली आणि सभात्याग केला.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image