२०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात व्हाव्या यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : भारत २०३६ मध्ये ऑलिम्पिक खेळांचं आयोजन करण्यासाठी बोली लावेल असं युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी म्हटलं आहे. पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक्स समितीच्या अधिवेशनादरम्यान सदस्यांसमोर भारत याबाबतचा एक आराखडा सादर करेल. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ठाकूर यांनी सांगितलं की, भारतीय ऑलिम्पिक्स संघटनेच्या बोलीला सरकार पाठिंबा देईल. गुजरातमध्ये आधीपासूनच जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधा आहेत आणि अहमदाबाद या खेळांसाठी 'यजमान शहर' असण्याची शक्यता आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.