राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कोविड नियमांचं पालन करावं अन्यथा यात्रा स्थगित करावी - मनसुख मांडविया
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कोविड नियमांचं पालन करावं अन्यथा यात्रा स्थगित करावी असं आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं आहे.
यात्रेदरम्यान कोविड नियमांचं काटेकोर पालन करावं, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सुनिश्चित करावा, ज्यांचं लसीकरण झालं आहे त्यांनीच यात्रेत सहभागी व्हावं असं त्यांनी दोन्ही मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, काँग्रेसने या पत्रसंबंधी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.