सरपंचानी कृतीशील विचार समोर ठेऊन काम केलं पाहिजे - डॉ.भारती पवार

 


मुंबई (वृत्तसंस्था) :  गावाच्या विकासातूनच राष्ट्रउभारणी होते गावपातळीवर काम करत असताना सरपंचानी कृतीशील विचार समोर ठेऊन काम केलं पाहिजे, असं मत केंद्रीय आरोग्य, कुंटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी व्यक्त केलं. पुण्यात आज पवार यांच्या उपस्थितीत, एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद, महाराष्ट्र राज्य पदाधिकारी अधिवेशन आणि नियुक्तीपत्र वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. गावाच्या विकासात सरपंचाची भुमिका महत्वाची असुन त्यांनी सर्वसामावेशी धोरणाने काम केलं पाहिजे, पंचायत ते संसद या प्रवासात सरपंच हे केवळ पद नाही तर तो सर्वसामान्यांचा विश्वास आणि सन्मान आहे, हे लक्षात घेतलं असं त्या म्हणाल्या. 

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image