राज्यातल्या सत्तासंघर्षावर घटनापीठात २७ सप्टेंबरला सुनावणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत घटनापीठापुढची सुनावणी आता येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे. शिवसेना कोणाची याबाबत निर्णय घ्यायला निवडणूक आयोगाला मनाई करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अंतरिम याचिकेची सुनावणी आज पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे झाली.

न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरली, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंव्ह यांनी दोन्ही गटाचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर २७ सप्टेंबर ही पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. 

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image