शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सत्ताधारी गणेश मंडळांना भेटी देण्यात मग्न असल्याची अंबादास दानवे यांची टीका

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी असंवेदनशील सत्ताधारी गणेश मंडळांना भेटी देण्यात मग्न असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यातल्या समनापूर इथल्या आत्महत्या केलेले शेतकरी नवनाथ शेळके आणि रुईलिंबा इथले आत्महत्या केलेले शेतकरी भागवत पिसाळ यांच्या घरी दानवे यांनी सांत्वनपर भेट दिली, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image