महिला एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताचा इंग्लंडवर ८८ धावांनी विजय
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांदरम्यान काल कँटरबरी इथं झालेल्या ५० षटकांच्या दुसऱ्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 88 धावांनी पराभव करुन मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांनी विक्रमी ३३३ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाबाद १४३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ २४५ धावा करु शकला. रेणुका ठाकुरनं चार गडी बाद केले. हरमनप्रीत कौर सामनावीर ठरली. तिसरा आणि अंतिम सामना शनिवारी लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. यानंतर अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.