शिवसेनेतल्या दोन गटांच्या वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आजचा युक्तिवाद संपला पुढची सुनावणी उद्या

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेतल्या फुटीनंतर दोन्ही गटांचा मूळ पक्ष असल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीला आला आहे. सरन्यायाधीश एन व्ही. रामण्णा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठासमोर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सध्या सुरु आहे.

ठाकरे गटाच्या बाजूने कपिल सिबल तर शिंदे गटाच्या बाजूने हरीश साळवे युक्तिवाद मांडला. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्यपालांची बाजू मांडली. पुढची सुनावणी उद्या होणार आहे. न्यायालयाच्या निवाड्यावर सध्याच्या सरकारचं आणि सरकारनं घेतलेल्या निर्णयांचं तसंच कामकाजाचं भवितव्य ठरणार आहे. 

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image