चाबहार बंदराच्या माध्यमातून मध्य आशिया क्षेत्रातल्या देशांशी व्यापार वृद्धीच्या संधी खुल्या करण्याच्या दिशेनं भारत काम करत आहे - सर्बानंद सोनोवाल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चाबहार बंदराच्या माध्यमातून मध्य आशिया क्षेत्रातल्या देशांशी व्यापार वृद्धीच्या संधी खुल्या करण्याच्या दिशेनं भारत काम करत असल्याचं केंद्रीय नौवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत आयोजित चाबहार परिषदेला संबोधित करत होते.

चाबहार हे बंदर म्हणजे प्रगत मध्य आशिया क्षेत्राला दक्षिण आशियाच्या बाजारपेठेशी जोडणारा दुवा असून हे बंदर व्यापार आणि  आर्थिक सहयोग वाढवणारं बंदर म्हणून उदयाला आलं असल्याचं सोनोवाल म्हणाले.

हे बंदर दोन भूभागांशी केवळ संपर्कच प्रस्थापित करणार नसून गुंतवणुकीचा ओघ वाढवण्यासह ते सांस्कृतिक आणि राजकीय संबंधांना बळकटी आणणार असल्याचंही सोनोवाल म्हणाले. 

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image