संसदेत प्रत्येक प्रश्नांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे, मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत - अनुराग ठाकूर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत प्रत्येक प्रश्नांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे, मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत, अशी टीका माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. ते आज संसदेबाहेर बातमीदारांशी बोलत होते. भाववाढीवरची चर्चा, कामकाजाच्या सूचीत आहे. मात्र विरोधक चर्चेसाठी तयार नाहीत. त्यांना चर्चेत रस नसून, कामकाज विस्कळीत करणं एवढाच त्यांचा हेतू असल्याचं उघड झालं आहे, असं ते म्हणाले. 

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image