जी-२० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची इंडोनेशियातील बाली इथं आजपासून बैठक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडोनेशियात बाली इथं आजपासून जी २० राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची दोन दिवसीय बैठक सुरू होणार आहे. अधिक शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध जगाची एकत्रित उभारणी ही या बैठकीची संकल्पना आहे.

ही बैठक दोन सत्रा होणार असून पहिल्या सत्रात जागतिक पातळीवर स्थैर्य, शांतता आणि विकासासाठी आपापसात विश्वास निर्माण करणं यासाठी एकत्र पावलं उचलण्यासंदर्भात चर्चा होईल. तर दुसऱ्या सत्रात अन्न आणि ऊर्जा सुरक्षेसाठी धोरणात्मक उपाययोजनांवर विचारविनिमय केला जाईल. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image