जी-२० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची इंडोनेशियातील बाली इथं आजपासून बैठक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडोनेशियात बाली इथं आजपासून जी २० राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची दोन दिवसीय बैठक सुरू होणार आहे. अधिक शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध जगाची एकत्रित उभारणी ही या बैठकीची संकल्पना आहे.

ही बैठक दोन सत्रा होणार असून पहिल्या सत्रात जागतिक पातळीवर स्थैर्य, शांतता आणि विकासासाठी आपापसात विश्वास निर्माण करणं यासाठी एकत्र पावलं उचलण्यासंदर्भात चर्चा होईल. तर दुसऱ्या सत्रात अन्न आणि ऊर्जा सुरक्षेसाठी धोरणात्मक उपाययोजनांवर विचारविनिमय केला जाईल. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image