पावसामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार - मुख्यमंत्री

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील जिल्हे, तसंच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, धुळे इथं मुसळधार पावसाने नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने भामरागड, अहेरी आणि सिरोंचा इथले कित्येक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल गडचिरोलीचा तातडीचा दौरा केला. दरवर्षी पावसामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image