केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ जनतेनं लाभ घ्यावा- रावसाहेब दानवे
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ जनतेनं लाभ घ्यावा, असं आवाहन केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमत्त काल जालना तालुक्यातल्या रामनगर इथं आयोजित आरोग्य मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जात आहेत. याशिवाय प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री मातृत्त्व योजना यासारख्या अनेक योजंनाचा लाभ नागरिकांना लाभ होत असल्याचं दानवे यांनी सांगितलं. जिल्ह्यातल्या बदनापूर, परतूर आणि राजूर इथंही आरोग्य मेळावे आयोजित करण्यात आलं होतं . या आरोग्य मेळाव्यांमध्ये हजारो रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.