प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत अर्जमंजुरीत महाराष्ट्र आघाडीवर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत देशात ३ हजार २१८ अर्जांना मंजूरी देण्यात आली असून यात महाराष्ट्र आघाडीवर आहे अशी माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली .राज्यातल्या  ५७९ अर्जाना या योजने अंतर्गत मंजूरी मिळाली आहे. राज्यातले सर्वच जिल्हे या योजनेत सहभागी झाले असून औरंगाबाद, सांगली आणि पुणे जिल्ह्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे असं त्यांनी सांगितलं. या योजनेची माहिती पात्र आणि गरजू लाभार्थीपर्यंत पोहचवण्याचे निर्देशही कृषी मंत्र्यांनी दिले आहेत. राज्याला मिळालेल्या यशाबद्दल कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्यासह विभागातल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं भुसे यांनी अभिनंदन केलं.