राज्यात आज कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. आज कोविड १९ च्या २५१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत एकूण ७८ लाख ७१ हजार २०२ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७७ लाख २० हजार ९२२ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ४३ हजार ७५२ रुग्ण दगावले. सध्या राज्यात २ हजार ५२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक ९ शतांश टक्के झालं आहे, तर मृत्यूदर १ पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image