केंद्र सरकारनं रद्द केलेल्या तीन कृषी कायद्यांना बहुसंख्य शेतकरी संघटनांचा पाठिंबा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं रद्द केलेल्या तीन कृषी कायद्यांना बहुसंख्य शेतकरी संघटनांचा पाठिंबा असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात नमूद केलं आहे. या त्रीसदस्सीय समितीच्या एका सदस्यानं काल हा अहवाल जाहीर केला, तेव्हा त्यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयानं नेमलेली समिती हे कायदे रद्द करायला अनुकुल नव्हती. पिकांची खरेदी विशिष्ट दरात करण्याचं काम राज्य सरकारांवर सोपवावं, जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द करावा, अशी शिफारस या समितीनं केली होती. समितीनं गेल्यावर्षी मार्च महिन्यात या शिफारशी सादर केल्या होत्या.किमान हमीभावाची पद्धत कायदेशीर करण्याचे स्वातंत्र्या राज्य सरकारांना देण्या बरोबरंच या कायद्यात अनेक बदल समितीनं सुचवले होते. मात्र शेती कायदे रद्द करण्यात आल्यामुळे आता या अहवालाचे महत्त्व उरलेले नाही, पण भविष्यात कृषी क्षेत्रासाठी धोरण तयार करताना या अहवालाचा उपयोग होईल, असं या सदस्यानं सांगितलं.

 

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image