राज्याच्या काही भागात अवकाळी पावसासह गारपीट, पिकांचं मोठं नुकसान
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्याच्या काही भागात काल आणि आज अवकाळी पाऊस पडला. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात काल संध्याकाळी गारपीटीसह झालेल्या अवकाळी पावसानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जवळपास ११ गावातील अकराशेहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. प्रशासन आणि कृषी विभागानं पाहणीसह पंचनाम्याला देखील सुरुवात केली आहे. हवामान खात्यानं येत्या तीन दिवसात जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पालघर जिल्ह्यातल्या काही भागातही आज सकाळी पाऊस झाला. आज सलग दुसर्याभ दिवशी धुळे शहर आणि जिल्ह्यात पाऊस झाला. काल संध्याकाळी झालेल्या वादळी पावसात अंगावर वीज पडून धुळे तालुक्यात बोरसुले गावात एका विवाहितेचा मृत्यू झाला तर एक मुलगी जखमी झाली. शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपीट झाली असून पिकांचं नुकसान झालं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.