मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारकडून ७६३ कोटी रुपयांची वाढीव मदत जाहीर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाडा विभागात ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारनं ७६३ कोटी रुपयांची वाढीव मदत जाहीर केली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी केला आहे. विभागात बीड जिल्ह्याला सर्वाधिक १४२ कोटी ३१ लाख, नांदेड १३६ कोटी ६९ लाख, औरंगाबाद जिल्ह्याला ९८ कोटी ८६ लाख, जालना ९३ कोटी २७ लाख, लातूर ९७ कोटी ४९ लाख, उस्मानाबाद ७१ कोटी ११ लाख, परभणी ६७ कोटी ६१ लाख, तर हिंगोली जिल्ह्याला ५६ कोटी १७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्यामार्फत विभागातल्या आठही जिल्ह्यांना हा निधी वितरीत केला जाणार आहे.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image