केवळ TCS, IBPS आणि MKCL मार्फतच भरती प्रक्रिया राबवण्याचे राज्य मंत्रीमंडळाचे आदेश
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य मंत्रीमंडळानं विविध पदांच्या भरतीसाठी पॅनलवरच कुठल्याही कंपनीची सेवा घेऊ नये, असा निर्णय घेतला आहे. यापुढं पदभरतीच्या सर्व TCS, IBPS, MKCL च्या माध्यमातून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १५ डिसेंबरला झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातला शासन आदेश काल प्रसिद्ध करण्यात आला आहेत. परीक्षेसाठी पॅनलवर असलेल्या सर्व कंपन्यांच्या पॅनलला मंत्रीमंडळानं स्थगिती दिली आहेत. त्यामुळं राज्य सरकारचे विविध विभाग, महामंडळं आणि इतर सहयोगी संस्थांना TCS, IBPS, MKCL च्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवावी लागेल.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.