प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत पंजाबमध्ये निर्माण झालेल्या त्रुटीबद्दल राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काल निर्माण झालेल्या सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. प्रधानमंत्र्यांनी आज दुपारी राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना कालच्या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली. उपराष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांशी आज चर्चा करुन काल झालेल्या घटनाक्रमांची माहिती घेतली. भविष्यात अशाप्रकारची चूक होऊ नये यासाठी कठोर पावलं उचलली जावी, अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कालच्या फिरोजपूर भेटीदरम्यान आढळलेल्या सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी पंजाब सरकारने आज दोन सदस्यांच्या एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. निवृत्त न्यायाधीश मेहताब सिंग गिल तसंच गृह आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव अनुराग वर्मा यांचा या समितीत समावेश आहे. समिती येत्या तीन दिवसांत अहवाल सादर करेल, अशी माहिती सरकारनं दिली आहे. यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयानं पंजाब सरकारकडून सविस्तर अहवाल मागितला आहे. या सुरक्षा त्रुटीसाठी कोण कारणीभूत आहे हे बघून दोषींवर पंजाब सरकारनं कडक कारवाई करावी असं गृह मंत्रालयानं सांगितलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेबद्दल असा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल म्हटलं आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image