१२ निलंबित सदस्यांनी सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्यामुळे त्यांचं निलंबन योग्य : एम व्यंकय्या नायडू
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज राज्यसभेचं कामकाज सुरु झाल्यावर, १२ सदस्यांच्या निलंबनावरून विरोधकांनी आजही गदारोळ केला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं होतं. यानंतर राज्यसभेचं कामकाज पुन्हा सुरु झालं आहे. आज कामकाज सुरु झाल्यावर सभापती एम. व्यंकैय्या नायडू यांनी निलंबनाविषयी स्पष्टीकरण देतांना सांगितलं की, या सदस्यांनी सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याबद्दल त्यांना निलंबित केलं आहे, अशा प्रकारच्या अयोग्य वर्तनासाठी निलंबन होण्याची ही पहिलीच वेळ नाही, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही निलंबनाची कारणं सूचीबद्ध केली आहेत. मात्र यादरम्यानच विरोधी पक्षांनी, विरोधी पक्षनेत्याला बोलू देण्याची मागणी करत सभागृहात घोषणाबाजी केली. त्यामुळे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं होतं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.