आरोग्य विभाग पेपरफुटी शासनानं घेतलेले निर्णय स्वीकारलं पाहिजे - अजित पवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणी राज्या लोकसेवा आयोगाला या सगळ्या परीक्षा पुन्हा घेणं अवघड आहे. त्यामुळे शासनानं घेतलेले निर्णय स्वीकारलं पाहिजे, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते आज पुणे इथं बोलत होते. ज्याच्या चुका असतील त्याच्यावर कारवाई केली जाईल,एवढी कडक कारवाई केली जाईल की परत कोणी असं करण्याची हिंमत करणार नाही, असंही उपमुख्यमंत्री म्हणाले. जिल्ह्यात 100 टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधीत लसीची पहिली मात्रा घेतली आहे. लसीची दुसरी मात्रा घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहीत करण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलावीत अशा सुचनाही पवार यांनी केल्या.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image