केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विशेष पथकाकडून राज्याच्या आरोग्य विभागाला लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याचे निर्देश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विशेष पथकानं राज्याच्या आरोग्य विभागाला लसीकरण मोहिमेचा वेग वाढवायचे निर्देश दिले आहेत. राज्याच्या काही भागात ओमायक्रॉनच्या रूगणसंख्येत वाढ होत, असल्याच्या पार्श्वभूमीवर या पथकानं राज्याचा दौरा केला. मुंबई, ठाणे, आणि पुणे परिसरात कोविड १९ तसंच ओमायक्रॉनच्या रूग्णांची वाढ असल्याचं निरीक्षण या पथकानं नोंदवलं. मुंबईची पाहणी केल्यानंतर या पथकानं राज्यातल्या आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत  काल  ठाणे जिल्ह्यातल्या रूग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारांची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी या तीन गावात नव्यानं ओमायक्रॉनचे सात रूग्ण आढळले आहेत. या तिन्ही गावात दिल्या गेलेल्या लसमात्रांची संख्याही कमी आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image