भारतानं न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना ३७२ धावांनी जिंकला
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये झालेला दुसरा कसोटी क्रिकेट सामना भारतानं ३७२ धावांनी जिंकला. याबरोबरच भारतानं ही दोन सामन्यांची मालिकाही १-० अशी जिंकली आहे. या मालिकेतला पहिला सामना अनिर्णित राहिला होता. आज सामन्याच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडनं कालच्या ५ गडी बाद १४० धावांवरून आपला दुसरा डाव पुढे सुरु केला. मात्र आर अश्विन आणि जयंत यादवच्या फिरकीसमोर, दिवसाच्या पहिल्या सत्रातच अवघ्या ११ षटकं आणि ३ चेंडुंमध्ये न्यूझीलंडचा दुसरा डाव १६७ धावांमध्येच आटोपला. न्यूझीलंडच्या वतीनं डॅरेल मिशेल यानं सर्वाधिक ६० तर हन्री निकोलस यानं ४४ धावा केल्या. भारताच्या आर अश्विन आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी ४ तर अक्षर पटेलनं एक गडी बाद केला. मयांक अगरवाल याला सामनावीर तर रविचंद्रन अश्विन याला मालिकाविराच्या पुरस्कारानं गौरवलं गेलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.