राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत तर लोकसभेचं कामकाज ३ वाजेपर्यंत तहकूब

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन झालेल्या गदारोळामुळे आज लोकसभेचं कामकाज दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. आज सभागृहाचं कामकाज सुरु होताच काँग्रेस आणि द्रमुकच्या सदस्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. तेलंगणा राष्ट्र समितीच्या सदस्यांनी सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी सुरु केली. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी सदस्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.राज्यसभेत काल या अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलेल्या १२ सदस्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या लोकसभा सदस्यांनी आज सभात्याग केला. त्यानंतर सभापतींनी कामकाज आधी दोन वाजेपर्यंत आणि नंतर ३ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image