वितरीत न केलेली वीज केवळ ग्राहकांची विजेची गरज भागवण्यासाठी वापरण्याची केंद्र सरकारची राज्यांना सूचना
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यांनी सीजीएस अर्थात केंद्रीय वीज निर्मिती केंद्रांची वितरीत न केलेली वीज केवळ त्यांच्या ग्राहकांची विजेची गरज भागवण्यासाठी वापरावी, अशी सूचना केंद्र सरकारनं केली आहे. काही राज्य आपल्या ग्राहकांना विज पुरवठा न करता लोड शेडींग लादतात. तसंच चढ्या दरानं ही वीज विकतात, असं मंत्रालयाच्या निदर्शनाला आलं असल्याचं केंद्रीय उर्जा मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. वीज वितरणाबाबतच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्रीय वीज निर्मिती केंद्रांची १५ टक्के वीज विना वितरीत ठेवली जाते. ती गरजू राज्यांना त्यांची गरज भागवण्यासाठी दिली जाते. ग्राहकांना वीज पुरवठा करणं हे ग्राहक कंपन्यांची जबाबदारी असून त्यांनी सर्वप्रथम ग्राहकांना अखंड विज पुरवठा करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं या निवेदनात म्हटलं आहे. याच उलंघन करण्याऱ्या राज्यांची अशी विना वितरीत वीज काढून घेतली जाईल आणि ती गरजू राज्यांना दिली जाईल, असंही त्यात म्हटलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.