खरिप हंगामासाठी विक्रमी १५० दशलक्ष टनांहून अधिक धान्य उत्पादन होईल असा प्राथमिक अंदाज
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा २०२१-२२ साठी खरीप हंगामातल्या शेती उत्पादनाचा पहिला अंदाज कृषीमंत्री तोमर यांनी काल जाहीर केला. त्यानुसार खरिप हंगामासाठी विक्रमी १५० दशलक्ष टनांहून अधिक धान्य उत्पादन होईल असा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांच्या सरासरी उत्पादनापेक्षा ते सुमारे १२ दशलक्ष टनांहून जास्त असेल. शेतकऱ्यांचे कष्ट, वैज्ञानिकांचं कौशल्य सरकारची शेतीविषयक धोरणं यामुळंच हे शक्य झाल्याचं तोमर म्हणाले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.