नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०१९ मध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ५९ टक्के वाढ झाल्याचं एका सर्वेक्षणात आढळून आलं आहे. ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची घरं, जमीन आणि पशुधन याबाबत जानेवारी ते डिसेंबर २०१९ या काळात केलेल्या परिस्थितीजन्य सर्वेक्षणातून ही माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाविषयी ठोस माहिती मिळवणं हा या सर्वेक्षणाचा उद्देश होता असं केंद्रिय कृषी सचिव संजय अग्रवाल यांनी सांगितलं. पंतप्रधान किसान योजनेद्वारे आतापर्यंत थेट लाभ हस्तांतरणातून ११ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना १ लाख ५८ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.