राज्यात महिला पोलिसांचे दैनंदिन कामाचे तास कमी करुन ८ तास करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात महिला पोलिसांचे दररोजचे कामाचे तास कमी करुन ८ तासांची पाळी करण्यात आली आहे. महिला, आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली. महिला कर्मचाऱ्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्याही सांभाळाव्या लागतात म्हणून त्यांना १२ तासांऐवजी ८ तासांची पाळी देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. हा निर्णय २७५ शहरी आणि ४२७ ग्रामीण पालीस ठाण्यांमधे लागू होणार असून ७०२ महिला कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.