केंद्रीय राखीव पोलीस दलानं काढलेली सायकल रॅली नागपूरहून दिल्लीकडे रवाना
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय राखीव पोलीस दलानं काढलेली कन्याकुमारी ते राजघाट सायकल रॅली आज नागपूरहून दिल्लीकडे रवाना झाली. ही सायकल रॅली काल नागपुरात दाखल झाली होती. आज नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, आणि CRPF चे उप महासंचालक प्रशांत जांभुळकर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं.संविधान चौकात आयोजित या कार्यक्रमात शहीद जवानांच्या वीर पत्नींचा गौरव करण्यात आला. तसंच सायकल रॅलीत सहभागी जवानांना मान्यवरांच्या हस्ते हेल्मेट आणि पुष्पगुच्छ देण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात देशातल्या नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन नितीन राऊत यांनी यावेळी केलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.