देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ५८ शतांश टक्क्यावर
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ५८ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल ३७ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी २४ लाखापेक्षा जास्त रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. काल देशभरात २५ हजार नवे रुग्ण आढळले. तर ३३९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ४३ हजार २१३ वर पोचली आहे. सध्या देशात ३ लाख ६२ हजार २०७ अॅक्टिव रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसींच्या ७५ कोटी २२ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल ७८ लाख ६६ हजार नागरिकंना लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. राज्यात काल नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त होती. त्यामुळे ॲक्टिव रुग्णांची संख्या पुन्हा ५० हजाराच्या खाली आली आहे. काल राज्यभरात ३ हजार २३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले, २ हजार ७४० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला.राज्यात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या ६५ लाख ६१७ वर पोचली आहे. त्यापैकी आतापर्यंत ६३ लाख ९ हजार २१ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३८ हजार १६९ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ४९ हजार ८८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ५ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.