देशभरात आतापर्यंत ४१८ लाख टनांहून अधिक गव्हाची खरेदी
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं किमान आधारभूत किमतीनुसार सुरू केलेल्या गहू खरेदीचा लाभ आत्तापर्यंत १ कोटी २० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी घेतला असून त्यांच्या खात्यात १ लाख ५४ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती ग्राहक कल्याण मंत्रालयानं दिली आहे.
आत्तापर्यंत केंद्र सरकारनं ४१८ लाख टनांहून अधिक गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच काळात ३६३ लाख टन गव्हाची खरेदी झाली होती. सध्याच्या रब्बी हंगामात या गहू खरेदीचा लाभ ४६ लाख शेतकऱ्यांनी घेतला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये अद्याप गहू खरेदी सुरू असून इतर राज्यातून ८१६ लाख टन तांदळाची खरेदीही करण्यात आली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.