नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाज माध्यमांवरच्या एखाद्या संदेशामुळे राष्ट्रीय एकात्मता आणि सार्वभौमत्वाला बाधा पोहोचत असेल, आणि त्याच्या स्त्रोताचा शोध लावण्यासाठी इतर पर्याय प्रभावी ठरले नसतील, तर व्हॉट्सॲपसारख्या समाजमाध्यमाला अशा संदेशाचं उगमस्थान विचारणं, म्हणजे गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन नाही असं स्पष्ट प्रतिपादन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केलं आहे.केंद्र सरकार नागरिकांचा गोपनीयतेचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे. त्याचप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही देखील सरकारची जबाबदारीच आहे असं माहिती तंत्रज्ञान मंत्रीरवी शंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. जेव्हा देशाच्या एकात्मता आणि सुरक्षिततेचा प्रश्न येईल, तर संदेशकर्त्याचा तपास या पद्धतीनं केला जाईल, या प्रक्रियेला कायद्याचंही संरक्षण देखील असेल, असं प्रसाद यांनी म्हटलं आहे.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image