नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधाचा काळ असतानाही रेल्वेनं मालवाहतूकीत उच्चांक नोंदवला आहे. गेल्या वर्षी 1हजार 205 दशलक्ष टन एवढ्या मालवाहतूकीच्या तुलनेत काल संपलेल्या आर्थिक वर्षांत 1 हजार 224 दशलक्ष टन एवढी मालवाहतूक करण्यात आली. यातून रेल्वेला 1 लाख 16 हजार 634 कोटी रुपये एवढी कमाई झाली आहे. गेल्या वर्षी ही कमाई 1 लाख 13 हजार 477 एवढी होती. गेल्या महिन्यात मालवाहतूक 122 पुर्णांक 19 दशलक्ष टन मालवाहतूक करण्यात आली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.