१२३ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचं काम प्रगतीपथावर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील रेल्वेस्थानाकांचा पुनर्विकास हे रेल्वे मंत्रालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. सार्वजनिक – खाजगी सहकार्य प्रकाल्पांअंतर्गत केंद्र सरकार आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांच्या सहभागातून हे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सद्यस्थितीत १२३ रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाचे काम प्रगतीपथावर आहे. स्थावर मालमत्तेच्या विकासासह या कामांसाठी एकंदर ५० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे.

काल हबीबगंज आणि गांधीनगर रेल्वेस्थानकांच्या विकासकामाची पाहणी करताना अद्ययावत विमानतळे आणि बहुउद्देशीय संकुले यांच्या धर्तीवर व्यावसायिकदृष्ट्या विकसित होऊ घातलेल्या रेल्वेस्थानकांच्या विकासकामांबद्दल गोयल यांनी समाधान व्यक्त केलं.

 

 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image