१२३ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचं काम प्रगतीपथावर
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील रेल्वेस्थानाकांचा पुनर्विकास हे रेल्वे मंत्रालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. सार्वजनिक – खाजगी सहकार्य प्रकाल्पांअंतर्गत केंद्र सरकार आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांच्या सहभागातून हे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
सद्यस्थितीत १२३ रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाचे काम प्रगतीपथावर आहे. स्थावर मालमत्तेच्या विकासासह या कामांसाठी एकंदर ५० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे.
काल हबीबगंज आणि गांधीनगर रेल्वेस्थानकांच्या विकासकामाची पाहणी करताना अद्ययावत विमानतळे आणि बहुउद्देशीय संकुले यांच्या धर्तीवर व्यावसायिकदृष्ट्या विकसित होऊ घातलेल्या रेल्वेस्थानकांच्या विकासकामांबद्दल गोयल यांनी समाधान व्यक्त केलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.