राज्यात काल ९ हजार ६८ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ९ हजार ६८ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले, तर २२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यभरात काल ८ हजार ७४४ नव्या रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या २२ लाख २८ हजार ४७१ झाली आहे. यापैकी एकूण २० लाख ७७ हजार ११२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, तर कोरोनाबळींची एकूण संख्या ५२ हजार ५०० वर पोचली आहे. राज्याच्या कोरोना मुक्तीदरात किंचित वाढ होऊन तो ९३ पुर्णांक २१ शतांश टक्के झाला आहे, तर मृत्यूदर २ पुर्णांक ३६ शतांश टक्क्यावर स्थीर आहे.

सध्या राज्यभरात ९७ हजार ६३७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

परभणी जिल्ह्यात काल १९ नवे कोरोनाबाधित आढळले, तर ३ जणांचा कोरोनामुळे मत्यू झाला. जिल्ह्यात काल एकही रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची नोंद झाली नाही. सध्या जिल्ह्यात ३०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात काल १७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. जिल्ह्यात काल सात नव्या रुग्णांचीही नोंद झाली, तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

गडचिरोली जिल्ह्यात काल २१ रुग्म कोरोनामुक्त झाले तर ७ नवे कोरोनाबाधित आढळले. सध्या जिल्ह्यात १६२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात काल ५१७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. काल जिल्ह्यातले ३४१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सध्या जिल्ह्यात २ हजार ८४४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image