भारत आणि पाकिस्तान दरम्यान स्थायी सिंध आयोगाची नवी दिल्ली इथं बैठक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि पाकिस्तान दरम्यान स्थायी सिंध आयोगाची बैठक आज नवी दिल्ली इथं आयजित करण्यात आली आहे. सिंधू नदीच्या पाण्यासंदर्भातील अधिकार या विषयावर ही बैठक होणार आहे. भारताच्यावतीनं या विषयाचे आयुक्त प्रदिप कुमार सक्सेना आणि त्यांचे पाकिस्तानचे समपदस्थ सईद मुहम्मद मेहेर अली शाह सहभागी होणार आहेत.

1960 मध्ये सिंधू नदी पाणीकरारादरम्यान या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. अफगाण मंत्री अफगाणिस्तानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री महंमद हनीफ अत्मर यांनी काल भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस.जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. अत्मर सध्या भारत दौऱ्यावर आहेत. या दोन नेत्यांमध्ये अफगाणिस्तानमधल्या शांतता प्रक्रीयेबद्दल चर्चा झाली. तसंच, दोन देशांमधल्या सहकार्य आणि विकासावरही चर्चा करण्यात आल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. 


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image